Monday 29 July 2013

दु्र्ग संवर्धनातील एक टप्पा.


||श्री||



श्री शिवस्वराज्य सेवा संघ आणि मॉडर्न कॉलेज,शिवाजीनगर पुणे-05 यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या सय्युक्त विद्यमानाने दुर्गंसवर्धन सोहळा आयोजित करण्यात आला होता. डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.छत्रपती शिवाजी महाराज की जय असे नुसते म्हणून आपले काम होणारे नाहीये. तर आपण स्वतः इतिहास आणि आपली संस्कृति जतन करण्यासाठी झटले पाहिजे. हे गड किल्ले महाराजांचे मूर्तिमंत असे जीवंत साक्षीदार आहेत. हजारो वर्षे हे सह्याद्रीचे कडे ऊन वारा पाऊस आणि काळाचे आघात आपल्या छातीवर मोठ्या डौलाने झेलत आहेत. काळाच्या ओघाने आणि मानवी हस्तक्षेपाणे यांचे नुकसान होत आहे, तरी आपण सगळ्यांनी गड किल्ल्यांच्या डागडुजी साठी सरकार वर अवलंबून न राहता या आपल्या हत्तींचे बळ असलेल्या मनगटांवर विश्वास ठेवावा! आता आपल्यालाच आपली मान, शान आणि आपला जाज्वल इतिहास जपावा लागणार आहे. उपस्थित युवशक्तीने डॉ.अमोल कोल्हे यांचे आव्हान स्वीकारले आणि आम्ही पण तुमच्या खांद्याला खांदा लाऊन या दुर्गंसंवर्धंनाच्या दैवी कार्यात योगदान देऊ अशी शपथ घेतली. एक खात्री देतो की काही अंशाने का होईनात दुर्गसंवर्धन आणि हिंदुराष्ट्राच्या जडण-घडणीत सुधारणा करण्यासाठी आज सेवा संघाने एक विधायक कार्य केले आहे. हे दैवी कार्य शेवट पर्यन्त असेच या खांद्यांवर समर्थ पणे पेलण्यासाठी आई भवानी चरणी प्रार्थना करतो....!!
मोडर्न महाविद्यालयात अमोलजी कोल्हें यांच्या प्रबोधनाला लाभलेला तारुण्याचा प्रतीसाद.

श्री शिवस्वराज्य सेवा संघाचे सदस्य व कार्यवाहक चि.सुजित चंद्रकांत नवले यांनी महाविद्यालयात व ईतरेतर केलेले काम सांगताना अमोलजी

तरुणाईला संबोधित करताना अमोलजी !

दुर्गसंवर्धनाला तरुणाईची गरज आहे, आम्हाला फक्त संदेश द्या आम्ही तुम्हास संपर्क करु.

Sunday 6 January 2013

मल्हारगड संवर्धन मोहिम - १


                ||श्री||


VINSYS Fort Restoration Group यांच्या पुढाकाराने व श्री शिवस्वराज्य सेवा संघाच्या मदतीने मल्हारगड (सासवड) येथे संवार्धानाचे काम दिनांक २२/१२/२०१२ रोजी सुरु झाले . किल्ल्यावरील दोन्ही मंदिरांची पूजा करून व किल्ल्यावरती बसविण्यात आलेल्या ध्वजस्तंभावरती भगवा ध्वज फडकावून कामाची सुरुवात झाली या वेळेस किल्ल्यावरती सगळे मिळून ८० तर @श्री शिवस्वराज्य सेवा संघाचे १४ मावळे उपस्थित होते पहिल्या टप्प्यामध्ये या किल्ल्याच्या महादारावाज्यातील झाडे काढून तेथील पायर्यांची डागडुजी व किल्यावरील दोन्ही विहिरींच्या भोवतानी दगडी रिंगन करणे मंदिरांची साफ सफाई करणे इत्यादी कामे करण्यात आली यावेळेस @shivaji trail चे +MILIND KSHIRSAGAR  , Sujata kshirsagar , Manoj Pawle, +Ganesh Raykar  , Amol kshirsagar, Shivaraj tarte महाराष्ट्र दुर्ग संवर्धक महासंघाचे @mangesh niravane उपस्थित होते.



























Monday 17 December 2012

"मल्हारगड , पुरंदर " दुर्गसंवर्धन मोहिम तयारी.


||जय आई भवानी , जय शिवराय ||

येत्या २२ तारखेला श्री शिवस्वराज्य सेवा संघ विन्सीस ह्या कंपनीमार्फत चालवल्या जाणार्या मल्हारगड दुर्गसंवर्धनास मदतीला सुरुवात करत आहे , आपल्यालाही मदत करायची इच्छा असेल तर संपर्क करावा.

दिनांक १५ डिसेंबर रोजी श्री शिवस्वराज्य सेवा संघ आपली उद्धीष्ठे व ध्येय सांगण्यास "राष्ट्रीय सेवा योजना, मोडर्न महाविद्यालय पुणे" यांच्या विषेश शिबीरात गेला होता . ह्यासाठी श्री. सप्रभाकर वराडे यांचे कोटी कोटी धन्यवाद. किल्ले संवर्धन काय आहे ? ते करणे का गरजेचे आहे , त्यात तरुणांनी सामिल होऊन शिवरायांच्या उपकारांची जाणिव असल्याचे दाखवुन द्या ! असे मुद्दे सुजित नवले ह्यांनी मांडले.
काय म्हणतील राजे जेव्हा पाहतील ज्या किल्लांवर वर्चस्व साधत त्यानी,
करोडो मंदिरे मुघलांपासुन वाचवत धर्मध्वज ग‍गली छाताड वर करुन फडकवला,
लाखो घरांतील आयाबहिणींची अब्रु सैतानी कुत्र्यांकडुन वाचवली,
दिल्लीमधल्या परकिय लुटार्यांची पळता भुई केली ,

आज ते किल्ले ओसाड पडले आहेत , फक्त पार्टांसाठी 
तरुणाई येथे भेट देत आहे
भिंती ज्या साक्ष देतात शिवरायांची ,  कोसाळत आहेत ,बदामांनी भरत आहेत.

ह्या वेळी आपणच उभे राहिले पाहिजे किल्यांसाठी , हिच वेळ आहे !

कार्यक्रमातील काही छायाचित्रे-

सुजित नवले , येत्या कार्यक्रमाची व दुर्गसंवर्धनाची माहिती देताना.


शुभम भेगडे , भारतीय संस्क्रुती चा संदर्भ देताना.


आमच्या सादरीकरणामुळे मुलांचे जेवण लांबले गेले , तरीही घोषणांमध्ये सिंह‍ही घाबरेल हि ताकद होती.
सर्व शिक्षकांचे अधिक धन्यवाद.



आम्हाला राष्ट्रीय सेवा योजानेचय्या प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांकडुन पाहुणचाराचा ध‍डा मिळाला.


विशेष धन्यवाद - राष्ट्रीय सेवा योजना , मोडर्न महाविद्यालय, पुणे.

Saturday 13 October 2012

''आजादी मेरी दुल्हन हैं, मेरी शादी तो पेहले हि हो चुकी हैं....!!''


''आजादी मेरी दुल्हन हैं, मेरी शादी तो पेहले हि हो चुकी हैं....!!''

असे म्हणणाऱ्या हुतात्मा सरदार भगतसिंग यांचा आज जन्मदिवस. स्वातंत्र्य साठी लढणाऱ्या या हुतात्म्याने इंग्रज सरकारची पळता भुई थोडी केली. त्यावेळेस स्वातंत्र्य हि गरज होती भारता
ची... पण आज या देशाला प्रखर हिंदुत्व वादी विचारांची आणि कर्तुत्वाची नितांत गरज आहे, नाहीतर जसे इंग्रज सरकारने आपल्या हिंदुस्तान वर राज्य करून आपल्याला गुलाम केले, तसेच इतर धर्मांध दळभद्री लोक या हिंदुत्वावर आक्रमण करायला टपले आहेत.
या हुतात्म्याच्या रक्ताचा अनमोल उत्तराधिकार आपल्या सगळ्यांना प्राप्त झाला आहे. आपल्या प्रत्येकामध्ये एक भगत सिंग दडपलेला आहे, आपण त्याला योग्य ती दिशा देऊन हिंदू धर्माची ज्योत आणि देशाचा इतिहास असाच अखंड ठेऊ..... या हिंदुस्तानला परम वैभवाला नेऊ...!
''मुझे भगतसिंग कि मौत दो................ हजार बार मरुंगा, हजार बार मरुंगा''
-शुभम सुधीर भेगडे (श्री शिवस्वराज्य सेवा संघ परिवार)

Gadadhar Chattopadhyay.


'The nearer you approach to God, the less reason and argue. When you attain Him,then all sounds- all reasoning and disputing- come to an end. Then you go into Samadhi- sleep-into communion with God in silence''


Born-Feb 18,1836
Died-Aug 1
6, 1886
Original Name-Gadadhar Chattopadhyay.
Acheivements- Provided spiritual enlightenment to the people of Bengal and played a key role in social reform movement in Bengal. In 19th century Ramkrishna Paramhans was one of the foremost Hindu spiritual leaders of the country.
-Shubham S. Bhegade (Shri Shivswarajya Seva Sangha's Family)